ट्रकच्या धडकेत शेतकर्‍यासह तीन म्हशी ठार

मांजरसुंबा परिसरातील घटना; चालक फरार नेकनूर  दि.21 : शेतात म्हशी घेऊन रस्त्याच्याकडेने जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये शेतकर्‍यासह तीन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा परिसरात घडला. या घटनेनंतर मोठा जमाव जमा झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. काही काळ महामार्ग रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली […]

Continue Reading

अंबाजोगाई शहरातील अक्षय मुंदडा यांची पतसंस्था फोडली

दोन लाखाची रक्कम लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद बीड दि.21 :  अंबाजोगाई शहरात अक्षय मुंदडा यांची अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था फोडून चोरट्यांनी 57 हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली.        शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी […]

Continue Reading

जप्त केलेल्या 12 दुचाकी तहसिल कार्यालयातून लंपास

चंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. […]

Continue Reading
grampanchayat

ग्रामपंचायतीचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द

राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणाबीड, दि.19 : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायतींचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे आता नव्याने याची अधिसुचना प्रकाशीत होऊन नव्याने हा कार्यक्रम जाहीर होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितले. राज्यातील 1566 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. तर जिल्ह्यातील 120 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सध्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची […]

Continue Reading
ramesh pokale- satish chavhan

सतीश चव्हाणांनी बारा वर्षातील बारा चांगली कामं दाखवावीत -रमेश पोकळे

बीड, दि.19 : माझ्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न मी आमदार नसतानाही सोडवलेले आहेत. पदवीधरांचे नाव घेऊन विद्यमान आ.सतीश चव्हाण यांनी 12 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं. त्यांनी 12 वर्षातील 12 चांगली कामे आम्हाला दाखवावीत, असे आव्हान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी दिले आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार […]

Continue Reading
attack on press reporter

पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण

व्हीडिओ झाला व्हायरल गुवाहटी -भूमाफीयांच्या विरोधात बातमी दिली म्हणून एका पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आसाममधील प्रतिदिन नावाच्या दैनिकाचा हा पत्रकार आहे.मिलन महंता रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या एका दुकानापाशी थांबलेले असताना काही जणांनी त्यांना अचानक घेरलं. त्यानंतर त्यांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू

पैठण तालुक्यात भीतीचे वातावरण पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत. अशोक मखाराम […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिता-पुत्र ठार

अपेगवतील घटनेने शेतकरी दहशतीखाली पैठण, (चंद्रकांत अंबिलवादे) दि.17- पैठण तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला असून शेती वस्तीवर काम करण्यासाठी मोल मजूर व शेतकऱ्यांना दहशतीखाली काम करावे लागत असतानाच सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करणारे पिता पुत्रावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने यामध्ये पिता-पुत्र ठार झाल्याची घटना घडले आहे त्यामुळे ग्रामीण […]

Continue Reading
acid halla neknoor

अ‍ॅसिड हल्ला झालेल्या ‘त्या’ पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

बीडमधील धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला नेकनूर, दि.15 : पुण्याहून गावाकडे परतत असताना प्रियकराने आपल्या प्रेसयीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिच्यावर पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रकार ऐन लक्ष्मीपुजनादिवशी पहाटे घडला होता. तब्बल बारा तासानंतर पीडितेच्या विव्हळण्याने आजुबाजुच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज या पीडितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने अख्खा […]

Continue Reading

सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरं-मस्जिद पाडव्यापासून उघडणार

 मुंबई दि.14 : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंदिरं अखेर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. […]

Continue Reading