crime

ब्लेडने वार करत, गळा दाबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल बीड दि.14 : कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सविता भागुजी रोहीटे (वय 25, रा.आहेर वडगाव) असे त्या […]

Continue Reading

चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीचा खून!

बीड दि.11 : चारित्र्याव संशय घेत गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनी येथे शनिवारी (दि.11) रात्री 8 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शेख मलिका शेख याकूब (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना […]

Continue Reading

गुरुंच्या विरहाने सेवकानेही घेतला जगाचा निरोप

माजलगाव मठाचे शिष्य विलासअप्पा शेटे यांचे निधन माजलगाव दि.11 : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती लिं.सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे सेवेकरी आणि मठाचे निस्वार्थी सेवक विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय 45) यांचे आपल्या गुरूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा त्रास होऊन दुपारी 1.40 वाजता निधन झाले. लिं. माजलगांवकर महाराजांचा समाधी […]

Continue Reading

एएसपी स्वाती भोर यांची बदली

बीड दि.9 : येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती रामराव भोर यांची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजित तानाजी धाराशिवकर (फस्के) यांची निुयक्ती करण्यात आली आहे. तर विजय लगारे यांची उपविभागीय पोलीस […]

Continue Reading

हनुमान महाराज गिरी यांना जामीन

बीड दि.8 : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळ्यानंतर 26 ऑगस्ट रोजी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला अटक […]

Continue Reading

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

अंबाजोगाई दि.8 : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि.8) अंबाजोगाई अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5 सप्टेंबर रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक […]

Continue Reading

सर्पदंशाने दोन चिमुकल्या दगावल्या; आईची मृत्यूशी झुंज

केज दि.8 : दोन मुलींसह आईला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि.7) मध्यरात्री केज तालुक्यातील सानेसांगवी नं.2 येथे घडली. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून आईची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्वा (4) व सुप्रिया दीपक साखरे (3) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर […]

Continue Reading

‘त्या’ बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

बीड दि.8 तालुक्यातील कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले पुरात वाहून गेली होती. यातील एका मुलाला वाचण्यात यश आले होते तर दुसरा मुलगा हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहुल कुडके व ओमकार सचिन विभुते हे दोघे कपिलधार येथे मंगळवारी दुपारी धबधबा […]

Continue Reading

माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading

प्राचार्या भारती बांगर यांचे निधन

गेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये […]

Continue Reading