echo adrotate_group(3);
अंबाजोगाईच्या शिक्षण वर्तुळात खळबळ
बीड : बारावी बोर्ड परीक्षेत (HSC BOARD EXAM) बीड जिल्ह्यातील गंभीर प्रकार बोर्डाच्या लक्षात आला असल्याने तीनशेपेक्षाही जास्त बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाने चौकशी सुरू केली. हे बहुतांश विद्यार्थी अंबाजोगाई येथील असल्याचे वृत्त आहे. यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली असून या विद्यार्थ्यांच्या निकालाला उशीर लागणार का? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.echo adrotate_group(6);
इयत्ता 10,12 बोर्ड परीक्षा HSC, SSC BOARD EXAM काळात अनेक गैरप्रकार समोर आले. आता या दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल जवळ आले आहे. परंतु याचा घोळ काही मिटत नसून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एक गंभीर प्रकार समोर आला. भौतिकशास्त्र (physics) पेपरमध्ये अक्षर बदल आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच पेपर तपासणी करणाऱ्यांनी याची माहिती बोर्डाला दिली. बोर्डाने गंभीर दखल घेऊन या सर्व 300 पेक्षा जास्त 12 च्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभागीय कार्यालयाने सुनावणीसाठी बोलावलं आहे. याची चौकशी सुरू झाली असून पहिल्या दिवशी एकूण ८७ विद्यार्थी सुनावणीसाठी हजर झाले. हे सर्व विद्यार्थी अंबाजोगाई येथील असून इतर मागे राहिलेले विद्यार्थी बहुतांश अंबाजोगाईचेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांच्या निकालाला उशीर लागणार असे चिन्ह दिसून येत आहे.echo adrotate_group(5);