echo adrotate_group(3);
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
बीड : यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याचा आज (दि.३१) शेवटचा दिवस होता. सर्व्हर डाऊन असल्यामुळे पीकविमा भरताना शेतकऱ्यांची दमछाक होत होती. त्यामुळे अखेर पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.echo adrotate_group(6);
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की, या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);