बीड

मराठ्यांनो कामे बुडवून अंतरवालीकडे येऊ नका, मी लढायला खंबीर

By Keshav Kadam

September 21, 2024

बीड दि.21 : मराठा समाजाने आपली कामे बुडवून अंतरवलीकडे येऊ नये. मी लढायला खंबीर आहे. फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी दोन चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 2024 उलथपालथं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मंत्री या नाही तर नकायेऊ पण आम्ही जिंकणारदोन हाताने टाळ्या वाजवल्यासारखे यांचे आंदोलने सुरू आहेत. मला भेटायला मंत्री आले की आमच्याकडे का आले नाही म्हणतेत. आमच्याकडे मंत्री येऊ नाही तर नाही येऊ पण आम्ही जिंकणार आहोत. माझा समाजावर आणि समाजावर विश्वास आहे.

जातीय दंगली घडवायच्या आहेत.आंदोलनासमोर आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली कशी? अशी आंदोलने म्हटल्यवर वाद होईल. आणि भुजबळ, फडणवीस यांना दंगल घडवायच्या आहेत. पण आपल्याला दंगल घडवायची नाही. आपण शांत राहायचं. आपली ताकत ओळखा आपली ताकत खूप आहे. आपण अन्याय करायचा नाही. फक्त शांत रहा, सहन होतंय तोपर्यंत करा..

13 महिने झाले शांतहोतोत, अजूनही शांतच रहावडीगोद्री हे गावकरी आपले आहेत. धनगर बांधव आपला आहे. हे उपोषण करण्यासाठी आलेले टकुचे दंगल घडावी यासाठी आलेले आहेत. जालना जिल्हाधिकारी, डीवायएसपी हे अधिकारी चांगले आहेत. चांगल्याना आम्ही चांगले आहोत. कायदा सू व्यवस्था पाहून त्यांना दुसरीकडे बसवा. हे जालना एसपी यांनी लक्षात घेतले पाहिजे.

परळीतून गाड्या पाठवणाऱ्याचअन् येवल्यावाल्याच बघतोवडीगोद्री येथील आंदोलनासाठी परळीतून गाड्या पाठवल्या. त्या गाड्या पठवणाऱ्याच आणि दंगल घडवण्यासाठी आंदोलनासमोर आंदोलन करण्यासाठी टोळ्या पाठविणाऱ्या येवल्यावाल्याच बघतोच असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.