मुंबईः कोरोनामुळे दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत अस्पष्टता होती. परंतू आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी म्हणजेच बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.
निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण यमंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकार्यांची बैठक बोलवली होती.