जातेगाव : बँकेच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भेंड येथे शनिवारी घडली.echo adrotate_group(6);
गजानन लक्ष्मण पवार (वय 30 रा.भेंड ता.गेवराई) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्याकडे एचडीएफसी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात दोन मुले आहेत. या प्रकरणी गेवराई पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);