mumbai

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 हजारांवर 

 मुंंबई  :  दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलै मध्यरात्रीपासून 15 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

यापूर्वीप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 5 या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तसंच मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 75 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालही सुरू करण्यात आली होती. तसंच सुट दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दीही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे.

Tagged