MODI

दहा राज्यांनी कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेल : पंतप्रधान मोदी

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्ली : कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव हा देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. अनेक देश कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात यशस्वी होत असताना, भारतात मात्र कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. याच संदर्भात आज मोदींनी १० राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर या दहा राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल. कोरोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो,” असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

“देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळालं. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना कोरोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल,” असं मोदी यावेळी म्हणाले.

Tagged