अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश
बीड : फडणवीस सरकारच्या काळात राज्य शासनाने 33 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत राज्यभरात मोहिम राबविली होती. यात जिल्ह्यात 57 लाख 60 हजार 350 वृक्षलागवड झाल्याची वनविभागाकडे नोंद आहे. आता याच वृक्षलागवडीची झाडाझडती होणार आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
फडवणीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवर हे वनमंत्री होते. त्या काळात बीड जिल्ह्यात वनविभागाने विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग, सामाजिक वनीकरण या विभागांसह 46 शासकीय यंत्रणांच्या साहाय्याने वृक्षलागवड करण्यात आली होती. त्यावेळी वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता इतर यंत्रणांनी केवळ ‘फोटोसेशन’ केले होते. दरम्यान, आता झाडाझडती होऊन वृक्षांचे मुल्यांकन झाल्यास 46 शासकीय यंत्रणातील अर्थात सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी अडचणीत येऊ शकतात. परंतू, तब्बल 57 लाख वृक्षांची चौकशी आणि सर्वच विभागांशी निगडीत विषय असल्याने चौकशी होईल असे सध्यातरी दिसून येत नाही.
अधिकारी झाले गब्बर33 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत वृक्षलागवडीत बीडसह राज्यात मोठा घोळ झालेला आहे, हे सर्वश्रुत आहे. कारण वृक्ष लावण्यात आली, त्यापैकी बहुतांश ठिकाणी खड्डे देखील दिसून येत नाहीत. परंतू भ्रष्टाचार मोठा असल्यामुळे चौकशीसाठी मोठी यंत्रणा लागू शकते. कसून चौकशी झाल्यास वनविभागातील गब्बर झालेले भ्रष्ट अधिकारी उघडे पडू शकतात. वनविभागातील भ्रष्टाचारातून कोट्यावधींची संपत्ती जमा करणार्या अधिकार्यांची विशेष चौकशी करायला हवी.