न्यूज ऑफ द डे

मुगगावमध्ये कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेतले

By Karyarambh Team

January 11, 2021

echo adrotate_group(3);

मुगगाव दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू बर्ड फल्यू ने झाला की, अन्य कशाने ? यासाठी कावळ्यांचे शव भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असले तरी आता पशुसंवर्धन विभागाकडून खबरदाराची उपाय म्हणून मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. बर्ड फ्ल्यूचा धोका वाढल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेकांनी बँकांचे कर्ज घेऊन या व्यवसायत उडी घेतली होती. मागील वर्षी कोरोनाने त्यांचे मोठं नुकसान केलं आहे. यावर्षी बर्ड फ्ल्यू आल्याने पोल्ट्री चालक धास्तावले आहेत. मुगगाव येथे कावळ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या टीमसह मुगगाव येथे दाखल होत परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत्यू कशामुळे होत आहेत याची चौकशी केली होती. तीन कावळ्यांचे शव भोपाळला परीक्षणासाठी पाठवले होते. कावळ्याच्या मृत्यूमुळे मुगगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान परभणीच्या मुरुंबा गावात अचानक 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली. याचा संसर्ग वाढू नये म्हणून मुरुंबा आणि आसपासच्या 5 किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे राख व टाक यांनी सांगितले. या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);