क्राईम

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By Keshav Kadam

February 06, 2021

जातेगाव दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव तांडा येथे घडली.

विजय श्रीराम पवार (वय 50 रा.जातेगाव तांडा, ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने शनिवारी (दि.6) जातेगाव येथील महाराष्ट्र बँकेचे त्याच बरोबर खाजगीत थकीत कर्ज व नापीकीस, अतिवृष्टीला कंटाळून घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.