anil deshmukh

न्यूज ऑफ द डे

गृहमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा नाही- जयंत पाटील

By Karyarambh Team

March 15, 2021

शरद पवार दर दोन तीन महिन्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेतात. ही बैठक पूर्व नियोजित होती. या बैठकीत गृहमंत्री बदलण्याचा कुठलीही चर्चा झाली नाही, मात्र या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांना निश्चित शिक्षा होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले वाझे प्रकरणावर बैठकीत कुठलीही चर्चा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो काही पुरावा आहे तो त्यांनी तपास यंत्रणाकडे द्यावा. सध्या हा तपास ANI करीत आहे.

वरूण सरदेसाई यांनी आरोप फेटाळले

दरम्यान याचवेळी वरुण सरदेसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील पूर्ण आरोप फेटाळले आहेत. आ. नितेश राणी यांनी त्यांच्यावर आरोप केले होते.