नांदुरघाट : केज तालुक्यातील नांदुरघाट येथील एका व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
संतोष बलभीम क्षीरसागर (वय 32) असे मयत व्यापार्याचे नाव आहे. त्यांनी आर्थिक संकटातून आलेल्या नैराश्यामुळे बीड तालुक्यातील चौसाळाजवळील नांदूरघाट रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी श्री.चौधरी यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते कपड्याचे व्यापारी होते. आर्थिक घडी विस्कटल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.