धामणगांव घाटात कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू!

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.11 : पुण्याहून बीडकडे येत असलेल्या बीडमधील टेकवाणी कुटूंबीयांच्या कारला धामणगांव घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी (एमएच-23 एएस-4025) रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tagged