corona

आज जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

बीड दि.27: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.8) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेवराई व वडवणी तालुक्यात कोरोना शुन्यावर आला आहे. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.8)1706 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 38 जण बाधित आढळून आले. तर 1668 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई […]

Continue Reading

नदीत वाहून गेलेल्या गुराख्याचा दुसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

परळी महसुल,न.प.अग्निशामक, ग्रामीण पोलीसांची मोठी मोहिम परळी दि.8 : तालुक्यातील पांगरी वाण नदीच्या बंधार्‍या जवळ एक गुराखी शेतातून जनावरांना घरी घेऊन जाताना वाहून गेला होता. ही घटना गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली होती. तालुका महसूल प्रशासनाला याची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे शोधमोहिम थांबवावी लागली […]

Continue Reading

पोलीस पत्नीकडून पोलीस पतीला न्यायालयाच्या आवारात मारहाण!

पत्नीवर शिवाजीनगर पोलीसात 353 चा गुन्हाबीड दि.7 : न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीस पत्नीने ड्युटीवर असलेल्या पोलीस पतीला मारहाण केली. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पत्नीवरच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सकाळी न्यायालयाच्या आवारात घडला. सद्दाम सत्तार शेख (वय 30) हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तर […]

Continue Reading

‘त्या’ घटनेत आत्याचा मुलगाच निघाला खूनी!

बीड दि.7 : राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या रांजणीजवळ मागील आठवड्यात एक मानवी सांगडा आढळून आला होता. गेवराई पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूंवर त्या महिलेची ओळख देखील पटवली होती. पोलीस तपासामध्ये ‘त्या’ महिलेचा तिचा आत्याच्या मुलानेच पैशासाठी खून केल्याचे समोर आले आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलेला […]

Continue Reading
ajit pawar

अजित पवारांच्या निकटवर्तीयांना झटका!

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाचे छापे बीड दि.7 : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारीच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदततीने ही कारवाई करण्यात […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

आष्टी दि.6 : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठ्यास बीड एसीबीने बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर उपअधीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (वय 49) हा सातबारावर […]

Continue Reading

घाटनांदूर परिसरातील नुकसानीच्या पाहणीसाठी पथक शेतकर्‍यांच्या बांधावर

कार्यारंभ इम्पॅक्ट : जि.प.अध्यक्षपतींसह तहसिलदार पाटील यांनी केली पाहणीघाटनांदूर दि.30 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील पीक पाहणी करण्यासाठी कुठलाच लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांत नाराजीचा सूर उमटत होता. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये ‘घाटनांदूर येथील नुकसानग्रस्त भागाकडे लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत गुरुवारी (दि.30) लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा ताफा […]

Continue Reading

‘त्या‘ आ.संदीप क्षीरसागर यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

बीड दि.29 : बीडचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना 2001 साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून आ.क्षीरसागर यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ.माधव गुमास्ते यांनी 25 सप्टेंबर 2001 रोजी छावणी पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

गुढ आवाजाने आवरगाव हादरले!

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण धारूर दि.29 : धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असणार्‍या आवरगाव येथे अचानक दहा वाजता जमिनीतून गुढ आवाज झाल्याने पूर्ण गाव हादरले आहे. पत्राची घरे आणि जूने मातीकाम असणार्‍या घरांच्या भिंतीला मोठ्याप्रमाणावर हादरे बसले आहेत. पूर्ण गावकरी एकत्र गावाच्या बाहेर रस्त्यावर जमा झाले असून प्रशासनास या घटनेची माहिती देण्यात आली आहे. धारुर तालुक्यातील […]

Continue Reading
nathsagar

नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु

चंद्रकांत अंबिलवादे । पैठणदि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची […]

Continue Reading