बीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.
समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरात उडी घेऊन समर्थचा मृतदेह बाहेर काढला.जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीत बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

budun mrutyu-panyat budun mrutyu