devendra fadnavis aggressive

भाजपचा पराभव मी स्विकारतो, मला पक्षाने सरकारमधून मोकळं करावं – देवेंद्र फडणवीस

बीड

मुंबई, दि.5 : भाजपला महाराष्ट्रात जो सेटबॅक बसलाय त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्विकारतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मी आमच्या वरीष्ठ नेत्यांना विनंती करतो की मला सरकारमधून मोकळ करावं, मी बाहेर राहिलो तरी मी पक्षासाठी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. काही ठिकाणी अँटीइंकबसी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडीत नेहरु यांच्यानंतर पुन्हा एकदा तिसर्‍यांदा पंतप्रधान बनण्याचा आर्शिवाद जनतेने मोदींना दिला. एनडीएचं सरकार देशात येते. 1962 नंतर पहिल्यांदाच तिसर्‍यांदा सरकार होतेय. ओदिशामध्ये भाजपचं प्रथमचं सरकार होतेय. आध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबूंच्या नेतृत्वात पसंती दिली, आरुणाचलमध्य पुन्हा भाजपचं सराकर आले. लोकसभासोबत एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिला. त्याबद्दल जनतेचे आभार असे फडणवीस म्हणाले. इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या. त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भाजप त्यांच्यापेक्षा मोठी राहिली, एनडीएचे घटकपक्ष मिळून सरकार तयार होते, असे देखील फडणवीस म्हणाले.