हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे

मुंबई | भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे, असं लोणीकर म्हणालेत. तुम्ही गावागावात जाऊन सांगा […]

Continue Reading
bpcl

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

मुंबई | केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने […]

Continue Reading
vasantrao salunke

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.वसंतराव साळुंके

बीड, दि.21 : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा माजलगाव तालुक्यातील सादोळ्याचे रहीवाशी अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची तर उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मुंबई येथील कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी परिषदेचे मावळते अध्यक्ष […]

Continue Reading

सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरं-मस्जिद पाडव्यापासून उघडणार

 मुंबई दि.14 : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंदिरं अखेर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. […]

Continue Reading

पालखीचे भोई व्हायचे असेल तर तुम्ही पक्षांतर करू शकता – उध्दव ठाकरे

सामानाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पक्षांतर करू पाहणार्‍यांना इशारा मुंबई, दि.26 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला […]

Continue Reading