acb trap

लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : वाटणी पत्राआधारे जमिनीची मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी तलाठ्याने 17 हजाराच्या लाचेची मागणी केली तडजोडअंती 15 हजाराची लाच स्वीकारताना खाजगी इसमास बीड एसीबीने बुधवारी (दि.28 ) रंगेहाथ पकडले. ही कारवाई चौसाळा परिसरात करण्यात आली असून या प्रकरणी नेकणुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप विष्णू कन्हेरकर (वय -34, व्यवसाय नोकरी, तलाठी, […]

Continue Reading

17 दिवसांनंतर जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित तर साखळी उपोषणाची घोषणा!

उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखलबीड दि.26 ः सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी  गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत बेमुदत आमरण उपोषण सुरु होते. सोमवारी (दि.26) दुपारी अंतरवाली सराटीतील माता महिलांच्या हस्ते पाणी घेवून त्यांनी हे उपोषण स्थगित केले. तसेच साखळी उपोषणची घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा […]

Continue Reading
MANOJ JARANGE PATIL

देवेंद्र फडणवीस घाबरले; मनोजजरांगे पाटील अंतरवालीत परतले!

बीड दि.25 ः काल आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र भांबेरी येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस हरला म्हणत, त्याने सागर बंगल्याचे दार उघडे असल्याचे सांगितले मात्र ते बंद केले. पोलीस बंदोबस्त वाढवला, मला मराठा समाजाचे नुकसान करायचे […]

Continue Reading
bachhu kadu

आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न पण जरांगे पाटलांनी निर्णय मागे घ्यावा

बच्चू कडू यांचे आवाहन बीडदि.25 ः प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे. सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मात्र एवढ्या महिन्यांची मेहनत, एवढा मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन मोडित निघेल. एवढ्या घेतलेल्या मेहनत असफल होईल. त्यामुळे त्यांनी […]

Continue Reading
MANOJ JARANGE

गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, मला मारु द्या…

बीड दि.25 :  मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या […]

Continue Reading
MANOJ JARANGE

जरांगे पाटील आक्रमक; सागर बंगल्याकडे रवाना!

बीड दि. 25 : अंतरवाली सराटी येथे आज रविवारी (दि.25) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, उपोषण करून मरण्यापेक्षा सागर […]

Continue Reading
MANOJ JARANGE AND NARAYAN RANE

निलेश राणे यांनी आपल्या वडीलांना समजावून सांगावं -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 ः निलेश राणे यांना विनंती आहे की तुम्ही त्यांना (नारायण राणे) थांबवा. नारायण राणे यांना नारायण राणे साहेब असेच आम्ही म्हणतो. नरेंद्र मोदी साहेबांना सुध्दा ओबीसीचा स्वाभीमान आहे. राणे साहेबांबद्दल आम्ही कधी शब्द काढला का? तुम्हाला तर मराठ्यांचा स्वाभीमान पाहीजे. आता माझी शेवटची विनंती आहे की निलेश राणे साहेब त्यांना थांबवा. नाहीतर […]

Continue Reading
MANOJ JARANGE

सगे-सोयर्‍यांचा कायदा झाल्याशिवाय माघार नाही -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारकडे सुपूर्द झाला आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नकोय त्या मराठ्यांनी मागासवर्ग आयोगामार्फत जे आरक्षण मिळेल ते त्यांनी घ्यावे. परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत पण त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र हवे आहे त्यांना सगे सोयर्‍यांचा कायदा करून कुणबींचे प्रमाणपत्र दिले जावे. सगे सोयर्‍यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलनातून […]

Continue Reading
ASHOK CHVHAN

काँग्रेसमध्ये भुकंप, अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपात जाणार

मुंबई, दि.12 : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते. त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा […]

Continue Reading
SCHOOL TIMING

चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नसल्याने घेतला निर्णय बीड, दि.8 : बदलत्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शासनाने आज चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळच्या सत्रातील शाळा 7 ऐवजी सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविल्या जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षी […]

Continue Reading