गेवराई दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील रेवकी येथे रविवारी सकाळी घडली. भागवत आसाराम चोरमले (वय 26 रा.रेवकी ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने रविवारी (दि.7) रेवकी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.OkPrivacy policy